search life

 ┈•❈••✦✾✦••❈•

  


पहिला प्रश्न तर हाच पडतो अस म्हणजे कस ? पण याच उत्तरही तस सोपच आहे 👉🏻 का म्हणून स्वताःला जगाव वाटत तस सोडून दुसर्यांना हव तस आपण जगावं...का म्हणून ? हेच काही कळत नाही. पण सगळ्यांना कळत बरं आपल आपण कस जागायच. पण सवयच झालेली असते. दुसर्यांना आपण बर आणी भारी वाटावं म्हणून ऐडजस्ट करत जगण्याची. काय मिळत अस ऐडजस्ट करुन तर फक्त आणी फक्त आपलाच आपल्याला होणार त्रास. आपण त्यांना हवं तस बोलाव... हव तस वागाव... त्यांना हव तस रहाव...आणी त्यांनी बोलाव आणी 

त्यांचच ऐकाव... का ? दुसर्यांच ऐकूण आपण गुलाम म्हणून जगण आपल्याला सोईचे वाटू लागले आहे का ? 


जेव्हापासून अस दुसर्यांसाठी ऐडजस्ट होत जगण्याची पद्धती आपण स्विकारली तेव्हापासून जगण्याची मजाच हरवली अस वाटू लागते. कारण लहानपणी आपण मनासारख वागल की, काही वेळा आपल्यातल आपल जगणे बघुन अनेकांना हर्ष व्हायचा... जेव्हा आपण शाळेत जायला लागलो तेव्हा शिक्षकांचच ऐकायच अस घरचा दांडपट्टा चालू झाला...त्या दिवसात 4 वाजता शाळेतून घरी येतांना जे काही मनासारख जगता येईल ते आणी घरी आल की पालकांनी दया दाखवली तर 1 ते 2 तास खेळायला दिले गेलेले पण मनासारख जगण्यात खर्च केलेले...


तेही दिवस सरले मग 10 वीला प्रवेश झाला की, मार्कांचे अंकगणित शिक्षक, आईवडिल आणी पाहुणे मांडू लागतात आणी तेव्हा आपल्या आनंदाची मनासारख जगण्याची वजाबाकी होऊ लागते. तेव्हा 10 वीचे मार्क दाखवता येईल असे मार्क मिळवतांना पाहुण्यासाठी, शाळेसाठी जगाव लागतं.. कॉलेज च्या आयुष्यात कॉलेज मधील teen age मुलींना दिसणारे, असणारे, बोलणारे नेमकी कसे मुले आवडतात ? याच शोध घेत जगाव लागत, जर एवढ ऐडजस्ट करुन झालच accedently प्रेम तर मग जगनेच बदलून जात असे म्हणले जाते. ( मला विचारु नका.) मग सुरावीतीला नव्याचे नऊ दिवस असतात. तेव्हा एवढ प्रेमाने, काळजीने, आदरयुक्त बोलले जाते की, बस्स्स विचार करु नका. पण ते सगळ जगण बनावटी असतं.. 


तिला मी तस आवडत नाही.. किंवा त्याला मी तस आवडत नाही. असा हा खोटा खेळ चालू होतो. मग काय खरी खरी बनवाबनवी मधे खर जगण ती तो आणी सगळेच विसरतात. Teen age हे वळणदार असते. कधी कुठ आपली सांगता केली जाईल हे काही सांगता येत नाही. पण येथून दुसर्यांसाठी दुसर्यांना हवे तसे जगण्याचे विषारी घोट पिण्याची सवय लागली जाते आणी आपल्या मनाचा घोट घेन्याची सवय होऊन जाते. 


जर अनेक जबाबदारीत असाल तर हा त्रास जाणवतो की मज्जा नाही जगण्यात. पण आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही याच कारण, आपण आपल्या मनासारखं हव तस जगत नाही. हे काही आपल्याला कळत नाही. मग लग्न झालेल्यांच काय हे मला माहित नाही... त्याचा फक्त अंदाज लावावा...! पण दुसर्यांना हव तस आपण जगाव यात घंटा समाधान मिळत नाही हे खरोखर खर वाटत. कारण आपण दुसर्यांना हव तस जगण्यात एवढा वेळ वाया घातलेला असतो की, आपण विसरतो खर जगण..


आयुष्य ऐडजस्ट होणार्या पाहण्यासारख केले आहे आपण. दुसर्यांना बर वाटतं म्हणून... हा मूर्खपणा आपणही केलेला असतो. पण आपल्याला दुसर्यांचा दिसतो. आपला मूर्खपणा दिसत नाही. कारण दिव्याखाली अंधारच असतो म्हणाव..! पण एक वेळ नक्की येते तेव्हा, जाणिव होते आपल्याला की, चुकलो राव आपण.. सतत दुसर्यांना हव तस ऐडजस्ट केले आपण आपल्याला पण मिळाल काय ? अनेकदा याच उत्तर फक्त नकारर्थी मिळेल. मग जर दुसर्यांना हव तस जगाव लागत असेल तर देवाने स्वतंत्र जन्म का दिला माणसांचा...? बैल दिला असता ? माकड दिला असता ?गाढव दिला असता ना ?


पण झाल अस की, आपला मनुष्य जन्म असुन आपण गाढव, बैल किंवा पाळीव प्राण्यांसारख जगत आहे तेही फक्त दुसर्यांसाठी... त्यांना हव तस आपण जगने याला ऐडजस्ट नाही पाळीव प्राणी होणे असे म्हणतात. कारण ऐडजस्ट करत असतांना आपल्या आनंदाला अर्थ उरत नाही. बघा जमत का तो ऐडजस्टमेंटच खूळ काढत मनमोकळ जगणे... पण एक लक्षात असाव "दुसर्यांसाठी नक्की जगाव पण दुसर्यांना हव तस नाही " व " स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नाही."...

┈•❈••✦✾✦••❈•┈

●विध्यारंग●

●प्रत्येक मनुष्याच्या हाती आयुष्यातील काही क्षण असे असतात की भविष्यातील क्षणाक्षणात हवे तेवढे सुरंग आणि ज्ञानमयसौंदर्य भरण्यासाठी मिळालेली उघड अवसर म्हणजे शैक्षणिक जीवन....✍

No comments:

Post a Comment