✦••❈•┈ आई ┈•❈••✦
श्रीमंताने त्याच्या मृत्यूच्या भीतीने अख्खा दवाखाना विकत घेलता,, तू आजवर कधी मयतेची भीती बाळगली नाही आणि बिनधास्त जगलीस आणि म्हणूनच तुझं जीवनच लोकांनी बिनधास्त समजून घेतलं आणि जगेल की वाऱ्या-पाण्यावर असं म्हणून दुर्लक्ष केलंय....तुझ्या म्हाताऱ्या जीवनाला आणि निवडणुकीतील मताला मोल होतं ते फक्त जगासमोर खाली वाकून पाया पडायला आणि हात पसरवून निवडून देण्याची भीक मागताना... पण ते हरामखोर विसरलेत त्यांचे कर्तव्य...जबाबदारी छतावर ठेवून जगत आहेत...एवढं नक्की की मरतील तेही खूप घाणेरड्या पद्धतीने...
![]() |
चूक त्यांची नाही माय... चूक तर आमच्या सारख्या नव युवक आणि युवतींची आहे... कारण आला प्रचार की घेतला एखाद्या पुढाऱ्याचा झेंडा आणि मिरवला गावभर, शहरभर, तालुकाभर...झाली महिला रॅली की पुढे आम्हीच... स्त्री शक्ती तिथेच आणि स्वहक्कांसाठी लढतानाच बाकी आम्ही तर अलिप्ततेची भूमिका घेतो... आणि द्यायचेच आहे ना मत कोणालातरी... मग द्या एकाला आणि व्हा मोकळे एकदाचे... आपल्या एका मताने कुठे काय फरक पडतोय... पण विसरतो आम्ही अशा चव्हाट्यावर बसलेल्या आईचे दृश्य त्या एका दिवसाला ठेवलेल्या आणि 24 तासांनंतर संपलेल्या व्हाट्सअप स्टेटस सारखंच... म्हणून माफ कर माय माउली आम्हाला.. तुझ्या या अवस्थेला प्रथमदर्शी जरी कुठलेही प्रशासन जबादार असले तरी मूळदोषी तर आम्हीच आहोत...आणि याला शिक्षा काय ते माहित नाही मला...कायद्यात नसेलही पण विधात्याच्या दरबारी द्यावा लागेल जाब म्हणून त्याचं प्रायश्चित म्हणून तरी आज माझा युवक-युवती जागे होईल का.... हा मला सुद्धा पडलेला गहन प्रश्न आहे... कारण लोकं क्षणिक जाणिवेचे झाले आहेत... हुई घटना... करी बकवास...दिया अपना ज्ञान... बजाया ढोल, नगारा.... की बस्स जलती ज्वाला कुछ क्षण ही चलती हैं...बाद में सब दंग हो जाते हैं नया मसला खडे होने की राह मेंजीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !
जीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !
नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.
नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.
पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्या वेळी काय करावे काय करू नये हे समजत नाही,गोंधळच होऊन जातो. आपण काहीतरी बोलून जातो, करून जातो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. गैरसमज ही गोष्ट पणं महत्वाची भूमिका बजावते, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करायला, नाते संपवायला.
एकमेकांना समजवून घेऊन, समजवून सांगून नाते जपायचे असते. एक गैरसमज नात संपवायला पुरून उरू शकतो. म्हणून एवढे दिवस नाते बनवायला लागतात पणं तिच नाती संपवायला एक क्षण पणं लागत नाही. म्हणून विचार पुर्वक निर्णय घेत जा. स्वतःची चुकी कबुल करायला शिकायला हवं. दुसऱ्याची चुकी विसरून त्यांना आपल्यात सामील करून घ्यायला हवं.
# नाते आयुष्याचे
# समजुन घ्यायला हवं
# आपली माणसं
# नाती जपायला शिकायला हवं

No comments:
Post a Comment