आई

    ✦••❈•┈  आई  ┈•❈••✦


 श्रीमंताने त्याच्या मृत्यूच्या भीतीने अख्खा दवाखाना विकत घेलता,, तू आजवर कधी मयतेची भीती बाळगली नाही आणि बिनधास्त जगलीस आणि म्हणूनच तुझं जीवनच लोकांनी बिनधास्त समजून घेतलं आणि जगेल की वाऱ्या-पाण्यावर असं म्हणून दुर्लक्ष केलंय....तुझ्या म्हाताऱ्या जीवनाला आणि निवडणुकीतील मताला मोल होतं ते फक्त जगासमोर खाली वाकून पाया पडायला आणि हात पसरवून निवडून देण्याची भीक मागताना... पण ते हरामखोर विसरलेत त्यांचे कर्तव्य...जबाबदारी छतावर ठेवून जगत आहेत...एवढं नक्की की मरतील तेही खूप घाणेरड्या पद्धतीने... 



         चूक त्यांची नाही माय... चूक तर आमच्या सारख्या नव युवक आणि युवतींची आहे... कारण आला प्रचार की घेतला एखाद्या पुढाऱ्याचा झेंडा आणि मिरवला गावभर, शहरभर, तालुकाभर...झाली महिला रॅली की पुढे आम्हीच... स्त्री शक्ती तिथेच आणि स्वहक्कांसाठी लढतानाच बाकी आम्ही तर अलिप्ततेची भूमिका घेतो... आणि द्यायचेच आहे ना मत कोणालातरी... मग द्या एकाला आणि व्हा मोकळे एकदाचे... आपल्या एका मताने कुठे काय फरक पडतोय... पण विसरतो आम्ही अशा चव्हाट्यावर बसलेल्या आईचे दृश्य त्या एका दिवसाला ठेवलेल्या आणि 24 तासांनंतर संपलेल्या व्हाट्सअप स्टेटस सारखंच... म्हणून माफ कर माय माउली आम्हाला.. तुझ्या या अवस्थेला प्रथमदर्शी जरी कुठलेही प्रशासन जबादार असले तरी मूळदोषी तर आम्हीच आहोत...आणि याला शिक्षा काय ते माहित नाही मला...कायद्यात नसेलही पण विधात्याच्या दरबारी द्यावा लागेल जाब म्हणून त्याचं प्रायश्चित म्हणून तरी आज माझा युवक-युवती जागे होईल का.... हा मला सुद्धा पडलेला गहन प्रश्न आहे... कारण लोकं क्षणिक जाणिवेचे झाले आहेत... हुई घटना... करी बकवास...दिया अपना ज्ञान... बजाया ढोल, नगारा.... की बस्स जलती ज्वाला कुछ क्षण ही चलती हैं...बाद में सब दंग हो जाते हैं नया मसला खडे होने की राह मेंजीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !

  

       जीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !

नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.

नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.


पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्या वेळी काय करावे काय करू नये हे समजत नाही,गोंधळच होऊन जातो. आपण काहीतरी बोलून जातो, करून जातो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. गैरसमज ही गोष्ट पणं महत्वाची भूमिका बजावते, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करायला, नाते संपवायला.


एकमेकांना समजवून घेऊन, समजवून सांगून नाते जपायचे असते. एक गैरसमज नात संपवायला पुरून उरू शकतो. म्हणून एवढे दिवस नाते बनवायला लागतात पणं तिच नाती संपवायला एक क्षण पणं लागत नाही. म्हणून विचार पुर्वक निर्णय घेत जा. स्वतःची चुकी कबुल करायला शिकायला हवं. दुसऱ्याची चुकी विसरून त्यांना आपल्यात सामील करून घ्यायला हवं.


# नाते आयुष्याचे

# समजुन घ्यायला हवं

# आपली माणसं

# नाती जपायला शिकायला हवं


:-/अभ्यास का? करत नाही?:-/

Book

 माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...



अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला... 


त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील... 



मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार

..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...


 वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..! 


ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...


 तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."


शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...


असाध्य ते साध्य करिता सायास

कारण अभ्यास तुका म्हणे...!


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•